नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री ८ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज भारतीय 'जीडीपी'च्या १० टक्के आहे. इतर देशांशी तुलना केली तर अमेरिकेने त्यांच्या 'जीडीपी'च्या १३ टक्के रक्कम आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. जपानने करोनापासून संरक्षण करण्यासाठी 'जीडीपी'च्या २१ टक्के निधी पॅकेज जाहीर केले आहे.
केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये गरीब आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत धान्य वाटपासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी मार्च महिन्यात जाहीर केलेले १.७ लाख कोटींचे पॅकेजचा समावेश आहे. तसेच बाजारात रोकड तरलता उपलब्ध करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेले ६.५ लाख कोटींचे पॅकेजचा समावेश आहे. त्यामुळे २० लाख कोटींच्या घोषणेने आता अर्थव्यवस्थेसाठी आता किमान १२ लाख कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे.
हे आर्थिक पॅकेज, आत्मनिर्भर भारत अभियानात एक महत्वाचा भाग म्हणून काम करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. अलीकडेच, सरकारने कोरोना संकटाशी संबधित ज्या आर्थिक घोषणा केल्या होत्या, रिझर्व बँकेने जे निर्णय घेतले होते. आणि आज मी ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा करतो आहे, ते सगळे एकत्रित केले, तर हे जवळपास २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज आहे, असे त्यांनी सांगितले. या सर्वांच्या माध्यमातून, देशाच्या विविध वर्गांना, अर्थव्यवस्थेच्या विविध साखळ्यांना, २० लाख कोटी रुपयांचा आधार मिळणार आहे. २० लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज २०२० मध्ये देशाच्या विकास यात्रेला, स्वयंपूर्ण भारत अभियानाला एक नवी गती देईल.
आत्मनिर्भर भारताचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी या पॅकेजमध्ये भूमी, श्रम, रोकड सुलभता आणि कायदे या सर्वांवर भर देण्यात आला आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. हे आर्थिक पॅकेज आमचे कुटिरोद्योग, गृहोद्योग, लघु आणी मध्यम उद्योग आपले एमएसएमई क्षेत्र, अशा सर्वांसाठी आहे, जे कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे, जे स्वयंपूर्ण भारताच्या आपल्या संकल्पाचा भक्कम आधार आहेत, असं मोदी यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा